वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार ; मूल तालुक्यातील घटना ; माणूस महत्त्वाचा की वाघ चर्चेला उधाण
मूल (अमित राऊत)
मूल तालुक्यातील जाणाळा येथील वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार जखमी झाल्याची घटना आज दिनांक 1रोजी दुपारी घडली. गुलाब वेळमे वय वर्ष 50 राहणार जाणाळा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराखीचे नाव आहे.
जाणाळा येथून जवळच असलेल्या डोनी फाट्याजवळ सराईत गाई, गुऱ्हे चरायला नेला होता. दबा धरून बसलेल्या वाघाने गुराखीवर हल्ला करून ठार केले. ही घटना गावात माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली आहे. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.
मूल तालुक्यात वाघाचे हल्ले मानवावर वाढल्याचे दिसून येत आहे त्यामुळे ग्रामीण भागात चिंतेची बाब झाली आहे. वन्य प्राण्यांचे असे हल्ले आम्ही किती सहन करायचे असे गावकऱ्यात बोलल्या जात आहे. माणूस महत्त्वाचा की वाघ अशी ही चर्चा होत आहे. गावकऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
0 Comments