चला झाडे लाऊया, माझी जबाबदारी माझे कर्तव्य!
मूल शहर स्वच्छ आणि निरोगी असावे.असे प्रशासनाला आणि सर्वसामान्य जनतेला वाटते. मागील १० /१५ वर्षाचा कालखंड लक्षात घेता माणसाच्या व समाजाच्या विचारात व आचरणात आमुलाग्र बदल झालेला आहे .
कुटुंब संख्या आणि लोक संख्या वाढते आहे ती वाढतच राहणार आहे. त्यानुसार प्रशासनाने अनेक बदल केलेले आहेत. परिणाम असा झाला की , नागरी वस्त्यांची सुधारणा करताना अनेक दोष निर्माण झाले आहेत. काही सुधारणा करतांना निसर्ग नियमांच्या विरोधात जाऊन केल्या गेल्या. परिणामतः मूल शहर वासियांना त्याचे भोग भोगावे लागत आहेत .
आज मूल शहर अतिशय वेगाने तापत आहे . नविन रस्ते ,त्यांचे सिमेंटीकरण.,झाल्यामुळे उन्हाळ्यात ऊन जशी वाढायला लागते तसे तापमान देखील खूप वाढते .आज आपण ४३℃/४४℃ च्या तापमानात अंगाची काहिली करून जगत आहोत .दि .०८ जून २०२३ पर्यंत मूल शहराचे तापमान ४७℃ पर्यंत वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे . शहराचे तापमान कमी ठेवण्याचा एकमेव उपाय म्हणजे शहरात विविध ठिकाणी व शक्य त्या ठिकाणी झाडे लावल्या गेली पाहिजे . किमान माझ्या शहराचे तापमान कमी करण्यासाठी आम्ही प्रशासनाला मदत केली पाहिजे . ही माझी जबाबदारी आहे . हे लक्षात घेऊनच झाडे लावण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे .
मूल परिक्षेत्रातील प्रशासन की , जे ,नगर परिषद , वन विभाग , बांधकाम विभाग तालुका क्रुषी , सिंचाई विभाग आणि असेच संलग्नित कार्यालये झाडे लावण्यासाठी योजनांची माहिती देताच आपण सहकार्य करूया . अशी मानसिकता आत्तापासून तयार करणे ही माझी जबाबदारी .!! माझे कर्तव्य!
0 Comments