शासनाच्या विवीध योजनांचा लाभापासून वंचित असलेल्या दिव्यांग बांधवांनी अनेक योजनेच्या मागणी करिता मूल पंचायत समिती येथे संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती यांनी व उत्पन्नाच्या तीन टक्के निधीतून लाभ द्यावे, गृह करा मध्ये 50 टक्के सवलत देण्यात यावी, दिव्यांगांना घरकुल योजनेमध्ये प्राधान्य व पाच टक्के निधी मिळावी. अशा विविध मागण्यांचे निवेदन मूळ तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी आज मूल पंचायत समिती मध्ये संवर्ग विकास अधिकारी यांना दिले.
निवेदन देताना राजू नागापुरे, महेश देवतळे, मनोज पिपरे, कैलास चलाख, नीलकंठ बुरांडे, हरिदास नागापुरे, बाबुराव नागापुरे, अंकुश लेनगुरे, नामदेव कोवे आदी मूल तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments