माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची वन विभागाचे मुख्य सचिवासोबत शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत आढावा बैठक
ताडोबा बफर झोन चंद्रपूर येथील कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे वनविभागाचे मुख्य सचिव वेणू गोपाल रेडडी व शोभाताई फडणवीस, माजी मंत्री यांची आढावा बैठक संपन्न झाली. त्यामध्ये शोभाताई यांनी शेतकऱ्यांचा अडचणीला वाचा फोडून शेतकऱ्यांच्या समस्या प्रामुख्याने मांडल्या. वाघ व मनुष्य संघर्ष यामध्ये शेतकरी वाघाच्या दहशतीमुळे आपली शेती करीत नाही शेतकऱ्यांनी आपले जीवन जगायचे कसे? दुसरे रानडुकरांची संख्या ,शेतीचे होणारे नुकसान. उभ्या पिकाची नासाडी करून रानडुक्कर शेतात येतात व पिकांची नुकसान करतात .आणि वन विभागाकडून थातूरमातूर नुकसान भरपाई देण्यात येते .ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांची थट्टा करणारी असून शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची योग्य भरपाई देण्यात यावी व वनविभागाच्या नुकसान भरपाई चे निकष बदलून शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्यानुसार वनविभागाने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी मान . शोभाताई यांनी मुख्य सचिव व पीसीसीएफ नागपूर यांना विनंती करून शेतकऱ्यांचे प्रश्न त्वरित निकाली काढावे .अशा मागणीचे निवेदन सादर करून लवकरात लवकर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात यावे अशी विनंती केली. यावेळी महेंद्र करकडे , मिलिंद हेडाऊ, विपिन भालेराव, संजय मारकवार ,अविनाश वरघंटीवार ,दादाजी येरणे , अन्वर शेख, विनोद सिडाम ,संतोष चिताडे प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Comments