Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

राजोलीच्या प्रवेशद्वारासमोरच चिखलाचे साम्राज्य,ग्रामपंचायतचे दुर्लक्ष

राजोलीच्या प्रवेशद्वारासमोरच चिखलाचे साम्राज्य,ग्रामपंचायतचे दुर्लक्ष

मूल प्रतिनिधी


मूल तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजोलीच्या प्रवेशद्वारासमोरच खड्डे पडले असून चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष झाले आहे.


राजोली ग्रामपंचायत ही मूल तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असून येथे शनिवारी आठवडी बाजार भरत असते, मोठी रहदारी सुरु असते. ये जा करायला नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रवेश द्वाराला लागूनच खाजगी दवाखाने आहेत. सोबतच घरांची वस्ती आहे, खड्ड्यात पाणी साचून राहत असल्याने आणि चिखल तयार झाल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. खड्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर खड्डे बुजवून ही समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी राजोली येथील नागरिक करीत आहे.

Post a Comment

0 Comments